Tuesday 4 August 2020

Review on Ritesh Bhoi solo show by Tathi Premchand

As we all can are going through the lockdown phase due to COVID-19 this 2020 year has been a rollercoaster ride for everyone and everyone has their own lockdown story to share. Here I am going to express the journey of a fellow artist Ritesh Bhoi  during lockdown and about his series of artworks done recently.



Looking back at few months, the journey through this ongoing lockdown period has been a way for everyone to rest at home and take a break for a while and also simultaneously keep working.

This huge break from our regular routine gave everyone a chance to do new things and keep their mind busy. Everyone found some or the other new thing which is intriguing to them. This new way of living is something everyone in common trying to adjust with. Every day the question “What to do next?” arises.



Talking about adapting towards this change, Ritesh here also went through the same like all of us. When government announced the lockdown Ritesh was in Mumbai. Considering the situation he decide to pack all the materials available and shift to his native place; Sangli. After reaching the destination as normal precautionary step Ritesh was under self-quarantine for two weeks.  To be productive in such a situation he continued with his ongoing artwork and began his thought process for new ideas.


As soon as the self-quarantine period ended for Ritesh Bhoi next situation he faced was a complete lockdown of his residential area. One of the problems he faced was that he was running out of materials to work with and due to the lockdown it was not possible to buy new apparatus to work with. 


One of the things to do during these times is to communicate with everyone around us to give and receive moral support through these tough times. Sitting on the porch of his house during his free time and talking to neighbors and people around is what Ritesh did. Communication just proves that by keeping distance people can still come together and support each other. This led to observing how people differ in their opinions, approach and all have a different story. 
As the lockdown situation was not getting any better there was still the obstacle in buying new materials but that did not stop Ritesh from working. A pen and a diary was a enough to keep the thought process in shape, started to paint a picture about the observations he made about people around and putting it on paper. As everyone has their own worries, some small or big, everyone has a common thought thinking about the future and what is awaiting.

Communicating with people not only showcased their physical effort to fight against the situation faced due to this virus but also the mental state of their mind. People everywhere have been going through a struggle on their own approach. We all know wearing a mask hides our half face and is a precautionary step taken by everyone, Ritesh expresses through his works that everyone’s eyes actually spoke louder than words. 

Ritesh Bhoi had a journey through this situation and still is ongoing just like everyone else, as he made best of his time in this I hope all us do too.

Text by Tathi Premchand
Nippon Gallery

लेखन - तथी प्रेमचंद ,
निप्पॉन गैलरी
कलाकार आणि  कला प्रबंधक 

Tuesday 21 July 2020

Nippon Gallery Presents Drawings by Ritesh Bhoi "Falling on Earth"


आपल्या आयुष्याततीन महिने मागे वळून पाहिलं तर हा lockdown  (माझ्यासकट) सर्वांना सुखाचीपर्वणी देणारा होता. (कारण हि वेळ पहिल्यांदाच आली होती) घरच्यांसोबत इतके आनंदी सुखाचे दिवस मिळाले. प्रत्येकजण आपापल्या विचाराने जसा जमेल तसा आनंद शोधत वेळ घालवत होता. आपले छंद, आवडी-निवडी  जोपासायला, नवनवीन काहीतरी शिकायचं अस म्हणता म्हणता नव्याचे नऊ दिवस निघून गेले. आणि या सर्व गोष्टीतलं नावीन्य हरवलं. सुरवातीला या सगळ्या गोष्ठी खूप मजेशीर वाटत राहिल्या. ठरविक एक वेळ निघून गेल्यावर आपली वैचारीक व संवेदनशील मन हळू हळू झालेल्या आणि होणाऱ्या गोष्टीवर विचार करू लागतात. आता पर्यंत ठीक होत पण आता इथून पुढे काय? असा प्रश्न उभा राहतो येणारा प्रत्येक दिवस हा नवीन प्रश्न घेऊन येतोय. प्रत्येकाने lockdown मध्ये केलेलीto do list आता ती संपली आहे. आता प्रश्न आहे तो आयुष्याच्या todolist चा.

सरकारने सुरक्षिततेच्या दृष्टीने lockdown जाहीर केला. तेंव्हा मि मुंबई मध्ये होतो. एकूण परिस्थिती चा विचार करता मी लगेच माझ्या गावी मिरज ला आलो. येताना दहा-पांधरा दिवस पुरेल इतकेच पेंटिंग चे समान व कपडे घेऊन आलो होतो. मुंबई मधून आल्यामुळे मला चौदा दिवस Home Quarantine करण्यात आले. या चौदा दिवसात मी माझी अपूर्ण राहिलेली पेंटिंग ची कामे आणि काही नवीन कामे पूर्ण करून घेतली.  नवीन कामातील एक काम अर्धवट राहील कारण आणलेले कलर संपले. आता कलर आणि इतर साहित्य घेउन येणे शक्य नव्हते. तोपर्यंत पुढाचा lockdown जाहीर झला. आता मात्र परिस्थिती वेगळी होती. पेंटिंग करायला कलर नव्हते. वाचन करायला पुस्तक घेऊन आलो नव्हतो. गावतील लायब्ररी बंद होती. त्यामुळे वाचन बंद झाल. मोबईल नेटवर्क पण बंद. त्यामुळे बसून राहण्याशिवाय काही पर्याय नाही अस झाल. दहा पंधरा दिवस असेच गेले,घरी कोणी येत नव्हते आणि आम्हीही कुठे जात नव्हतो. घराच्या पोर्च मध्ये बसून अत्यावशक सेवेतील लोकांची ये जा, सरकारी कर्मचारी, व्यापारी, शेतकरी अशी ठराविकच लोक मला दिसत होते. आणि पोर्च मध्ये बसल्या बसल्या या सगळ्यांच निरीक्षण करणं इतकचं मि करू शकत होतो.

        पण प्रश्न असा होता कि निरीक्षण तरी किती दिवस करणार कारण तोपर्यंत पुढा lockdown जाहीर झला होता. त्यामुळे मी काही प्रयत्न करून एक कोरी डायरी आणि पेन यांची जमवाजमव केली. माझ्या पाहण्यात आलेल्या या लोकांच्या चर्चा, त्यांना प्रशासनाने दिलेली जबाबदारी, एकूणच आलेली परिस्थिती, त्या परिस्थितीवर प्रशासनाच नियंत्रण, या सगळ्यामध्ये काम करणारे लोक, आलेल्या काळाच गांभीर्य, आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी घेतली जाणारी काळजी. अश्या ज्या ज्या गोष्टीच मी निरीक्षण केलं ते मी माझ्या डायरीमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न करू लागलो. सुरवातीला या सगळ्या गोष्ठी खूप वेगळ्या होत्या पण मीत्या सेवेतील लोकांसोबत मीएक माणूस म्हणून जेवा बोलू लागलो त्यांची काळजी करू लागलो. त्यांच्यासोबत चर्चा केली.त्यावेळी लक्षत आल कि आलेल्या परिस्थितीला तोंड देत असताना, इथून पुढचा प्रवास कसा असेल.या सगळ्याचा मीजेंव्हा विचार करू लागलो तेंव्हा मलासुद्धा या अत्यावशक सेवेतील माणसांनी लावलेल्या मास्क मागील त्यांचा खरा चेहरा, आपल्या परिवाराबद्दल काळजी, भविष्याचा प्रश्न, पोटासाठी अन्न धन्य. हे सगळ कोरोनामुळे आलेल्या संकटापेक्षा हि खूप गंभीर प्रश्न सामान्य माणसाला सतावत आहेत. आपण ठीक आहे घरी बसूनआहोत. पण हे सेवेतील लोक जे प्रशासनाबरोबर आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांना या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे, तरी ते आपल कर्तव्य करत आहे. त्यांच्याशी बोलताना बरीच चर्चा झाली. त्याचं बोलन आणि त्यांनी मास्क लावल्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नव्हता पण त्यांचे  डोळे खूप काही बोलत होते. काळजी, भीती, प्रेम, कर्तव्य, जबाबदारी हे सगळ त्या डोळ्यात जाणवत होते. आणि माझ्या संवेदनशील मनाला भावलेलं ते चित्र मीरोज रेखाटत होतो.
त्यातील काही चित्र हि पुढीलप्रमाणे आहेत

SAVE DATE : 25 July 2020/ 11am NIPPON ONLINE SOLO

Nippon Gallery
Presents
Drawings 
by
Ritesh  Bhoi 
"Falling on Earth"
Welcome to Nippon Gallery, a digital platform to connect artists with art collectors globally.Log on to our Online Platform to discover more about these Indian artists
and high-caliber artworks from studio.

Venue: Gallery Hall 4 

25th to 4th August 2020 
........................................................................................
NIPPON GALLERY 30/32, 2nd Floor, Deval Chambers,Nanabhai Lane, Flora Fountain, Fort,Mumbai – 400 001 India.



Nippon Gallery Presents Drawings by Ritesh Bhoi "Falling on Earth"

SAVE DATE : 25 July 2020/ 11am NIPPON ONLINE SOLO
Nippon Gallery
Presents
Drawings 
by
Ritesh  Bhoi 
"Falling on Earth"
Welcome to Nippon Gallery, a digital platform to connect artists with art collectors globally.Log on to our Online Platform to discover more about these Indian artists
and high-caliber artworks from studio.

Venue: Gallery Hall 4 

25th to 4th August 2020 
........................................................................................
NIPPON GALLERY 30/32, 2nd Floor, Deval Chambers,Nanabhai Lane, Flora Fountain, Fort,Mumbai – 400 001 India.

Sunday 19 July 2020

निपॉन… प्रयोगशील स्पेस .


आधुनिक कला संदर्भात विचार करताना मला असे दिसून आले .की नव्याण्णव टक्के कलाकार हे फ़क्त मनोरंजनाचे  पुस्तक किंवा माहितीची जाहिराती साठी जे काही कथा कविता वर्णनात्मक चित्रण करावे लागते . तश्याच  प्रकारची चित्र छापत आहेत . तसं चित्र काढणं वाईट नाही .पण त्यामुळं मुख्य कले मधून खरी कला गायब झाली आहे . नेहमीच्या गेलेरीच्या पांढऱ्या खोक्याच्या आत कला असेंलच असं नाही . बाहेरच जे जग आहे .त्यात कला आहे .असे मला वाटतं.

त्यामुळं प्रदर्शन भरवत असताना . नवीन प्रयोग करणाऱ्या कलाकारांना ऑन लाईन  संधी देणे गरजेचे वाटते . त्यामुळे मी तीन  तरुण प्रयोगशील अभिव्यक्ती करणाऱ्या चित्रकारांची निवड केली आहे . हा एक प्रयोग आहे हे मला माहीत आहे .
भारतात अनेक चित्रकार कला शिक्षण घेऊनच चित्र काढताना दिसतात .आर्टिस्ट कमी आहेत . असतील तें जगा समोर येत नाही त्यांना ऑन लाईन जगा समोर आणावं असे मला वाटतं म्हणून मी नीप्पोन नावाची गँलरी मुंबईत प्रत्यक्षात केली आहे . आमची गँलरी ही नवनवीन प्रयोग करणाऱ्याना उत्तम संधी निर्माण करुन देते असा हेतु आहे . सध्या च्या ऑन लाईन प्रदर्शना निमित थोडसं
हीना शेख .भूषण भोँबले .शंतनू देबनाथ या तिघांचे ऑन लाईन प्रदर्शनाचा प्रयोग मी करत आहे .

           हिना शेखचा जन्म पुणे, महाराष्ट्र, येथील असून . तिने बी.एफ. फाईन आर्टचे शिक्षण भारती विद्यापीठातून आणि एम.एफ. शिक्षण हे एस.एन.डी.टी मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. ती मुस्लिम कुटुंबातील आहे . बहुतेक वेळा तिच्या कुटुंबीयांनी तिची चित्रकला बंद केली.  लहानपणापासूनच चित्रकार एम एफ हुसेन हे तिचे  प्रेरणास्थान आहेत . भारतीय विचारवंत जे. कृष्णमूर्ती आणि चित्रकार वि .एस. गायतोंडे पॉल क्ली , नसरीन मोहम्मदी यांचा प्रभाव प्रेरणा ती मान्य करते .

Artist : Heena Shaikh :  Size 22x30in Acrylic on Paper


हिना हिने आपल्या कारकिर्दीची सुरूवात तिच्या कुटुंबातून प्रेरणा घेऊन केली, तिचे कुटुंबातील सदस्य साइनबोर्ड पेंटर आहेत . आणि त्यापैकी बहुतेकजण चित्रपटाच्या डिझाइनसाठी काम करतात , तिला जुन्या कॅलेंडर डिझाईनची आवड आहे . प्रेरणा घेत प्रयोग करत राहणे तीला आवडते .
 हीना म्हणते , चित्र प्रकार हा दोँन शिखराच्या मधील एक पूल असतो . भावना इच्छा आणि इच्छेस असणारा रंग निवडून ती चित्र रंगवत जाते . तिचा स्वतः चा शोध सुरू राहतो . हीना म्हणते . मी कल्पिलेंल्या , अनुभवलेल्या गोष्टी रंगवतें .


Recent work by Bhushan Bhomble 


          भूषण भोँबले , याचे कला शिक्षण  जी .डी आर्ट , हे एल एस रहेजा स्कूल ऑफ आर्ट , मुंबई. इथे झाले . डीप्लॉमा इन आर्ट एज्युकेशन हे सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई. इथे झाले .शिक्षणानंतर कला प्रवास करताना भूषण म्हणतो मला जे आवडते तें मी रंगवतो .मला जे आवडते ते चित्रित करतो , ती व्यक्तिनिष्ठ चित्रकला नाही , ती मला आवडत असलेली प्रक्रिया आहे ,त्या प्रक्रिये सोबत जेव्हा माझा प्रवास सुरू होतो , त्या वेळेचा परिणाम माझी कला असते . तिथे मी असतो . चित्रकार प्रभाकर बर्वे, डॅमियन हिर्स्ट इत्यादी महान कलाकाराकडून प्रेरणा घेऊन कला प्रवास करताना . भूषण म्हणतो ' नैसर्गिक  अभिव्यक्ती ' , ज्याचा मी संपूर्ण आनंद घेत आहे .नैसर्गिक अभिव्यक्ती हाच विचार त्याचा विषय आहे .
 
Recent work by Santanu Debnath
                     शंतनू देबनाथ हा मूळचा कोलकाताचा आहे  . त्याचे  बी.एफ. चे कला शिक्षण तिथेच झालं . कोलकाता मध्ये बालपण गेले . त्यामुळे  त्याच्या  चित्रकलेचे विषय त्याच्या  लहानपणी ज्या गावात वाढला .त्या गावातून त्याला सापडले .
        जेव्हा जेव्हा तो त्याच्या गावात परतला तेव्हा तो आजूबाजूचे लोक, वातावरण, यात नवीन भावनेने एकरूप होत जातो .त्याला गावातील अनेक अनैतिक विधी आणि चालीरीती समजल्या गेल्या आणि त्यापासून प्रेरणा मिळाली .त्याला त्यामुळे एक अखेरची जाणीव झाली , की त्याच्या गावातली रहस्यमय वातावरण त्याच्यासाठी एक अपरिहार्य प्रेरणा बनली आहे, ज्याने त्याला त्याची  चित्रे तयार करण्यास प्रेरित केले.
त्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांची मूळ जीवनशैली व्यक्त करण्याचा आणि त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न तो करतो आणि त्यांचे शारीरिक हावभाव ठेवण गुण एका वर्णनकथात्मक आणि डोळ्यांना स्पष्ट नसलेल्या सोप्या पद्धतीने रंगवतो .बर्याचदा त्याच्या चित्रातील आकृती एकाकी अवस्थेत दर्शविली जातात . जी त्यांच्या सामान्य जीवन व्यवसायाचा व्यवहार व्यवस्थेचा परिणाम आहे . त्याला आता माझ्या गावात काम करण्याची सवय झाली आहे . त्याचे समकालीन कार्यकाम आणि त्याचे गाव यांच्यात खूप जवळचे नाते आहे.शंतनू हे दृश्य कथनकार आहेत .

तीन ही कलाकार स्वतंत्रपणे चित्र प्रवास करत आहेत .पण प्रत्येकाचं वेगळे असणं नैसर्गिक आहे .यांच्यात सारखेपणा आहे , तो असा की तें म्हणतात . तें निसर्गाच्या मानवी मनाच्या प्रेरणेने काम करतात .यांच्या निमित्ताने मी जेव्हा सर्वत्र पाहतो तेव्हा मला जाणवते तें प्रत्येक जण कोणा ना कोणाच्या प्रभावा खाली काम करत आहेत . कोणी त्यांचे विचार घेतात. कोणी चित्रआकार रचना  घेतात .

पॉल क्ली  किंवा गायतोंडे याच्या रंगीत चित्रांच्या सारखे अनेक चित्र  दिसतात . संदेश चित्र म्हणजे जाहिरात दृश्य नरेटिव बातम्या वाटतात . म्हणून मी म्हणतो नव्याण्णव 99% टक्के लोक फ़क्त उदारहण आणि  वर्णन कथनात्मक काम करतात .त्यात कला नसते . जाहिरात, बातम्या, संदेश, घोषणा आदेश देणारी, अशी सर्वच चित्र वाटतात .गेलरी सुध्दा चौकटीच्या बाहेरच प्रदर्शनाला तयार होत नाहीत .यांच्या निमित्तानं मी चौकटीच्या बाहेरील कला प्रयोग करणाऱ्या साठी प्रयत्नशील आहे . काहीजण स्वःताला पोलिटिकल आर्टिस्ट समजतात . हा त्यांचा मोठा भ्रम आहे .कारण चित्रकार पिकासो याने गूर्निका हे जगप्रसिद्ध चित्र बनवले तेव्हा त्याच्या मनात हा विचार नव्हता की पिकासो पोलिटिकल आर्टिस्ट आहे .लोकानी काही काळानंतर तसा विचार मांडला .आज जे भारतात पोलिटिकल आर्टिस्ट आहेत .तें मूळचे राजकारणी स्वभावाचे आहेत .राजकारणी आहेत हे नक्की दिसतय .म्हणून त्याच्या चित्रात ललितकला नसते . म्हणून ज्याना प्रयोग करायचं आहेत त्यांचे स्वागत आहे . विचार मांडायचे आहेत स्वागत आहे .

 गेलेरीत चित्र पाहताना तुम्ही जे बाहेर घेवून जाता तीच ललितकला (Fine Art) आहे .- तथी प्रेमचंद ,








लेखन - तथी प्रेमचंद ,
निप्पॉन गैलरी
कलाकार आणि  कला प्रबंधक 
संकेत स्थळ : -  www.nippongallery.com